शुक्रवार, ८ मार्च, २०२४

में मुक्कमल हु



My next short film's end song



में मुक्कमल हु. में पूरी हु बिन तेरे भी

नजर तेरी ख़राब और घुंगट में ओढू.
तेरा खुद पर काबू नहीं इसलिए बुरखा में पेहनू
बेशरम बनकर तू रहे
और शरमाना न में छोड़ू।

ये सब अब भूल जा ..... क्युकी,
में मुक्कमल हु. में पूरी हु बिन तेरे भी

मेरा हौसला उन उंचाइयोंपर हे
जहा तेरा बौना कद ना पहोच पायेगा।
मेरा आसमान इतना ऊँचा है
उसपर तू क्या छीटा उड़ाएगा।

मुज़से बराबरी की की कोई उम्मीद ना रखना.....क्योकि,
में मुक्कमल हु. में पूरी हु बिन तेरे भी

शरम का पडदा मैंने खोल दिया है
अाुस बहना मैंने छोड दिया है
जंगल में भेड़िये बहोत है
पर घर बैठना मैंने भी छोड दिया है.

अब मेरी आबादी और मेरी बर्बादी में खुद चुनुंगी
मेरे मुक्कदर में टाके में खुद गडूंगी.....क्योकि,
में मुक्कमल हु. में पूरी हु बिन तेरे भी

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

कुंकू टिकली बांगड्या

 काल एक फॉरवर्ड व्हिडिओ आला, जो सहसा मी बघत नाही, पण बहिणीने ग्रुप वर टाकला म्हणून सहज बघितला. त्यात एक "कीर्तनकार" बाई तावातावाने बोलत होती. तिच्या बोलण्याचा सारांश हा होता की, हिंदू धर्म बुडत आहे आणि त्याला बुडवण्यात मुख्य भूमिका ही बायांची आणि त्यांच्या तोकड्या कपडे घालणाऱ्या मुलींची आहे. आया मुलींना कूंक, टिकली, बांगड्या घालण्याची सक्ती करत नाहीत. आणि त्या हेही म्हणल्या की, ज्या पोरी तोकडे कपडे घालतात आणि त्या मुळे जर त्यांच्यावर बलात्कार होत असतील( आणि त्या मुळेच होतात ) तर त्या मुलींच्या कानाखाली मारली पाहिजे.


हे सगळं ऐकून मी सुन्न झालो. आणि हा व्हिडिओ एका स्त्री ने शेयर करावा याचे मला खूपच आश्चर्य वाटले. मुळात स्त्री चे चारित्र्य तिच्या कपड्यात शोधण्याची ही कुठली वृती? जिथे स्त्री पूर्ण कपड्यात असते तिथे बलात्कार होत नाही असे तिला म्हणायचे आहे का?

स्त्रीने शरीरभर कपडे घातले की समाज सुसंस्कृत होतो का? समाज म्हणजे फक्त स्त्री का? सगळे कायदे फक्त तिलाच का?  हे कीर्तनकार कधी मुलांच्या नियमंबद्दल बोलताना आढळत नाहीत. तरुण मुलांनी संध्याकाळ झाली की घरी परतावे. जीन्स घालू नये, धोतर झब्बा घालावा, तिळा लावावा. असे कधी ऐकले आहे का?

मुळात बलात्कार हे अनादी काळापासून होत आहेत, जगातील सर्व भागात होत असतात, जगातील कुठलाही वर्ण, घर्म, आर्थिक स्थर, सामाजिक स्थर या पासून मुक्त नाही. अंगभर बुरखा घालून फिरणाऱ्या बाया पण या पासून सुरक्षित नाहीत.

समाजाच्या निर्मितीसाठी पशुरुपी मानवाने समाजातील सर्व स्थरांचे हक्क अबाधित राहावेत म्हणून सामाजिक नियमांची निर्मिती केली. पण तेव्हा पासून आज तागायत माणसातील पशू हा या ना त्या मार्गाने त्यावर हवी होतो आणि माणूस खून, बलात्कार असली कृत्य करतो. त्यासाठी त्यास पशू समान शिक्षा होणे अपेक्षित आहे.

माणसाचे मानवी करण करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत, एक शिक्षा आणि दुसरे शिक्षण. आणि या दोन्ही गोष्टी दोघांसाठी गरजेच्या आहेत, परूष आणि स्त्री. हे लक्षात घ्या जेव्हा बलात्कार होतो तेव्हा त्या पुरुषातील पशू हा त्याच्या मानवी मनावर हावी होतो. याचाच अर्थ समाज त्या पुरुषावर संस्कार करायला , आणि त्याच्या मनात शिक्षेची भीती निर्माण करायला कमी पडला आहे. त्या मुळे खऱ्या संस्काराची आणि शिक्षेची गरज त्या पुरुषाला आहे.

पितृसत्तात्मक समाजात नियम लिहिणारा पुरुषच असल्याने त्याने सहजच सर्व नियम चौकटी ह्या स्त्रियांसाठी बनवल्या. अग्नीपरिक्षा फक्त सिते साठी. बायकोला जुगारात हरणाऱ्या युधिष्ठीरास काय शिक्षा मिळाली? नवरा मेल्यावर बाई ने सती जायचे आणि पुरुषाने बायको मेल्यावर खुशाल दुसरे लग्न करायचे. आणि त्यावर कडी म्हणजे ती सती कशी आदर्श आहे, म्हणून तिची पूजा स्त्रियांनी करायची. चौदा वर्ष राम वनवासात राहूनही राज्य चाललं ना? मग अजून दोन वर्ष तेही का गेले नाही सीते बरोबर?

स्त्रियांना हे लक्षात आले पाहिजे की हे सगळे पौराणिक दाखले हे त्यांचे हक्क कमी करून त्यांना धर्माच्या नावाखाली गुलाम बनवण्याचे आहेत. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे.

प्रश्न विचारणारी स्त्री ही अधर्मी, घरा बाहेर पडणारी स्त्री ही अधर्मी, मनाप्रमाणे कपडे घालणारी स्त्री ही अधर्मी. त्या व्हिडिओ मधे त्या बाईने डोक्यावर पदर घेतला आहे का? माझा त्या बाईला प्रश्न आहे, जर तुझ्या दृष्टीने तोकडे कपडे घालणारी मुलगी जर धर्म बुडवत असेल, निर्लज्ज असेल तर तुझ्या आधीच्या पिढीच्या दृष्टीने तूही डोक्यावर पदर न घेऊन निर्लज्ज पणा करत आहेस. तुझा नवरा मेल्यावर तू सती जाणार आहेस का? नाही. का नाही? एके काळची आपली ती संस्कृती होती, मग आता तू ते नियम का पाळत नाहीस? कारण आपण त्या प्रथेची समीक्षा केली आणि ती प्रथा कालबाह्य वाटली,अन्याय कारक वाटली आणि ती आपण बंद केली. (इंग्रजांनी बंद केली)

आपल्या हिंदू धर्माचे हेच खरे वैशिष्ट्य आहे. आपण प्रश्न विचारू शकतो. आपण बदलू आणु शकतो. धर्मात उत्क्रांती झाली पाहिजे. होताच राहिली पाहिजे तरच तो काळाशी तर्कसंगत राहील. पण हे असले सनातनी लोक धर्माच्या नावा खाली आपल्याला मागे लोटू पाहतात. धर्माच्या मूळ विचारांपेक्षा त्यातील रूढी पंपरांना वर आपली पोळी शेकातात. स्त्रीला आम्ही सन्मान देऊ पण तिने आम्ही आखलेल्या चाकोरीतूनच चालावे, ही विचारसरणी स्त्रियांनी तरी खपून घेता कामा नये. तुझ्या डोळ्यात लालसा आहे तर अंगभर कपडे मी का घालू? इथे सुधारण्याची गरज तुला आहे मला नाही. हे ठासून सांगितलं पाहिजे.

कुठल्याही संस्कृतीचे मूळ हे.. एक मेकांवर प्रेम करणे, आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे हेच असते.
या पेक्षा जास्त काहीच नाही. पण कालांतराने त्या वर रूढी परंपरेची पुटे चढू लागतात. आपण नेहमी म्हणतो आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे..पण मुळात आपल्याला तो अभिमान त्या चढलेल्या पुटांबद्दल असतो. मूळ संसृतीचा अंश तर खोलवर आत झाकला गेला असतो. जागत कुठलीही संस्कृती परफेक्ट नाही. आपलीही नाही. तिला डोळस पणे बघून तिला सर्वसमावेशक, सर्वहितकारी बनवण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपण मुळात पशू आहोत, मानव बनत राहण ही निरंतर प्रक्रिया आहे.


कुठलाही कट्टरतावाद चांगला नाही. तो समाजाला मागेच नेतो. धर्म कुठलही असो.."आपला धर्म संकटात आहे" असे म्हंटले की सगळा समाज आंधळ्या मेंढरा सारखा त्या आवई उठवणाऱ्यच्या मागे चालू लागतो. अर्थात यात फायदा त्या माणसाचाच असतो. कारण तो त्याचा धंदा असतो. जर तुम्ही या सनातनी लोकांचा कावा वेळीच ओळखला नाही तर तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल की स्वयंपाक घराचा उंबरा हीच तुमची वेस आहे.



मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

आर. के. लक्ष्मण तुम्ही गेलात त्याने काहीही फरक पडलेला नहिये.





आर. के. लक्ष्मण तुम्ही गेलात त्याने काहीही फरक पडलेला नहिये.
जनतेच्या शिव्या, कोर्टाचे  ताशेरे, भ्रष्टाचाराचे आरोप  यानेही ज्या राजकारण्यांच्या  गेंड्याच्या काताडीवरील सुरकुतीही हलत नाही, तिथे तुमच्या व्यंगचित्रांच काय घेऊन बसलाय?
आणि खर सांगायचं तर तुमच्या व्यंगचित्रात व्यंगच उरलेलं नव्हत. राजकारणी माणूस निवडून आल्यावर भ्रष्टाचार करतो यात कसलं आलाय व्यंग?
आणि त्याला निवडून देताना आम्हाला काय माहित नसत?, कि आज आपल्या जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या नावाने भाड्कावणारा, विरोधकांच्या नावाने बोंबा मारणारा हा माणूस उद्या निवडून आल्यावर काय करेल? आम्ही हे सगळ स्वीकारलाय, तुम्हाला उगाच त्यात काहीतरी व्यंग दिसत.

बर झालं तुमच्या व्यंगचित्राची जागा मोकळी झाली. आता तिथे एखाद्या बिल्डरने एखाद्या राजकारण्याला वाढदिवसा निमित्य "शतायुषी" होण्याची जाहिरात तरी देत येईल.…  आणि त्याच्या शेजारी एक बातमी असेल "कॉमन man च्या स्मारक उभारणीत भ्रष्टाचार". ते वाचून आम्ही निर्विकार पणे पान उलटू. आणि तीच असेल खरी तुम्हाला वाहिलेली प्रतीकात्मक शेवटची श्रद्धांजली.


गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

एक सुबह




काश एक सुबह ऐसी आए
निंदसे उठे आदमी और अपना धर्म भूल जाए.


चुटिया गायब, दाढ़ी सपाट.
नमाज़ ना प्रेयर, आरती ना पूजा पाठ.


पहले रोज सुबह का वक्त यूही जाया होता था,
कोई चिल्ला चिल्ला कर, तो कोई गा कर गला सुकाता था.

कुछ लोग तो सुबह उठकर सर पकड़ बैठे थे.
उन्हे तो यही याद नही जीवन मे पहले वो क्या करते थे.
काम काज की तो कोई ज़रूरत ना थी
लोग तो पैर छूकर पैसे दिया करते थे.


काम पर निकला आदमी घुम्म्ट देख चकराया,
यहा बच्चो को खेलने की जगह नही, ये ढकोसला किसने बनवाया.


मंदिर खाली थे, मसजीत थी सुनसान,
गिरजा घर बना दिए क्लासरूम, गुरुद्वारे अनाज के गोदाम.


एक पगोडे को मुज़ियम बनवाया. सारी मूर्तिया, तसबीरे, धार्मिक ग्रंथोको उसमे रखवाया.
और दालन पर लिखवाया.
"अंदर की चीज़े बिल्कुल ना छुए, वो बोहोत घातक है,
उनमे इंसान को इंसान से  लड़ाने  की ताक़त है"



शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

कैसे खत्म होगी तेरी ये दहशत, ये तो सारा गुलशन जला रही है.
कल क़त्ल किये जो मासूम तूने, उनकी माँ अब भी लोरी गा रही है.

ख़त्म करना तो तुज़े वाज़िब नहीं क्यों के तू भी तो एक इंसान है.
कहासे आयी ये नफरत तुज़मे, तेरा भी तो कोई भगवान है.

में मरने के लिए तैयार हु, बशर्त तुज़े सारी नफरत भुलानी होगी
जीतनी गोलिया है तेरे सलाह खानेमे सारी मेरे दिल मे उतारनी होगी।

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४


Interstellar 2015 

पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अखिल मानव जात नाश पावण्याच्या मार्गावर आहे. नासा एका महत्वाकांक्षी योजनेवर काम करत असते ज्यात काही साहसी अंतराळ वीरांना ते नवीन पृथ्वीच्या शोधा साठी अंतरिक्षात पाठवणार असतात. त्यासाठी ते काही अनुभवी अंतराळवीरांची निवड करतात. कुपर एक अनुभवी वैमानिक. आमेलिया एक जिज्ञासू खागोल्शास्त्राद्न्य. आणि भारतातून एक महान खगोल, गणित, आणि भौतिक शास्त्रद्न प्रो. मकरंद अनाजपुरे.
अनाजपुरे हे  ग्रामीण भागून आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक. सोबत त्यांच्या त्यांनी खास अंतराळ प्रवासासाठी तयार केलेला रोबोट "नर्साळ्या".
अनाजपुरे आपल्या सोबत त्यांचे शास्त्रज्ञ गुरु अशोक सराफ यांना पण घेण्याची विनंती करतात पण प्रो. ब्रान्ड त्यास नम्र नकार देतात.

टीम दोन प्लान तयार करते. प्लान A नवीन राहण्याजोगा ग्रह शोधायचा आणि पृथ्वीवरील माणसांना तेथे हलवायचे.
प्लान B.   अनाजपुरे यांच्या सिद्धांता नुसार. जे काही पृत्थ्वीवर घडते त्या घटनेच्या प्रकाश व धव्नि लहरी अंतराळात जाऊन स्थिरावतात. आणि प्रत्येक काळाचा एक समय प्रतल तयार होतो. हिंदू धर्माचा रिती नुसार श्राध्द आणि त्यात उच्चारलेल्या मंत्र धव्नि लहरी त्या त्या समय प्रतलात जाउन त्या व्यक्तींना पुन्नर जीवित करते. त्या मुळे तो समय प्रतल फक्त पुनः प्रत्यय न राहता एक प्रती शृष्टी बनतो.

अनजपुरे यांच्या म्हणण्या नुसार हिंदू प्राचीन वैज्ञानिकांकडे(ऋषीमुनी) विश्वनिर्मित व विश्व लय या दोघांची उकल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शनि ग्रहाजवळ "वरवंटा" नावाचे वर्म होल आहे तेथून त्या प्रतलात शिरकाव केला जाऊ शकतो.  आणि त्यांच्याशी संपर्क साधून पृथ्वीच्या सध्यस्थिती बद्दल काही मार्ग शोधत येईल. अनाजपुरे आपल्या काही मागण्या प्रो. ब्रान्ड पुढे ठेवतात. १. यानात देवपूजेची एक स्वतंत्र खोली पाहिजे. २. अधून मधून त्यांच्या घरच्यांशी संपर्क झाला पाहिजे आणि ३. रोज सकाळी मटा ची digital कॉपी यानावर पोहोचली पाहिजे. प्रो. ब्रान्ड त्या नुसार सर्व व्यवस्था करतात आणि यान मानवजातीच्या उद्धारा साठी एका महान प्रवासाला सुरवात करते.

साडेतीन वर्ष प्रवास करून यान "वरवंट्या" जवळ पोहोचते "वरवट्यात" प्रवेश करून यान समय प्रतल जाळ्यात पोहोचते. एका समय प्रतला जवळून जात असताना प्रोफेसर आपल्या मयत आजी आजोबांना भेटण्यासाठी यान त्या समय प्रतलात वळवण्याची विनंती करतात. पयलेट कुपर या गोष्टीवर आक्षेप घेतात. टीम मीटिंग होते. त्यात प्रोफेसर फार जोर देतात आणि भेट पटकन आवरण्याची हमी देतात, शेवटी काही काळासाठी यान वळवण्याचा निर्णय घेतला जातो. प्रोफेसरांची आजी आजोबांची भेट होते. भेट झाल्यावर यान पुढच्या प्रवासाला निघते.

दरम्यान साडेतीन वर्षाच्या प्रवास काळात आमेलिया आणि प्रोफेसारांमध्ये फारच जवळीक वाढते. प्रोफेसर तिला "पृथ्वी वाचेल तेव्हा वाचेल. पण मानवजातीच्या कल्याणासाठी आपण यानातच प्रजननाचे प्रयोग चालू करणे किती गरजेचे आहे" हे पटवून देतात. अर्थात कुपर चा  त्याचा आक्षेप असतो.

यान पुढील एका समय प्रतला जवळून जात असताना प्रोफेसर शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी यान वळवण्याची वीनंत करतात. यावर वैमानिक कुपर यांचा तोल ढळतो आणि दोघांमध्ये प्रचंड हाणामारी होते. आधी कुपर प्रोफेसरांना मारतात, मग प्रोफेसरांना कुपर मारतात मग पुन्हा कुपर प्रोफेसरांना मारतात. आमेलिया मध्ये पडून दोघांना सोडवते. एक टीम मीटिंग होते त्यात यान न थांबवता पुढे नेण्याचा निर्णय घेतला जातो.

शेवटी ते पुराण काळातील योजिलेल्या प्रतलात पोहोचतात. तिथे काय घडते? काय त्यांना पृथ्वी वाचवण्याचा मार्ग सापडतो? हि रंजक कथा आहे इंटर स्टेलर मध्ये. अवश्य पहा. 

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

Kavita

बरेच दिवस एक कविता मनात घर करून होति. आज ती शब्दांची लयाची कसलीच तमा न बाळगता कागदावर उतरली.
(एका बस थांब्यावर दोन चवदा वर्षाच्या मुली आहेत. एक एकटी आहे. एक पालकांसोबत आहे.)

कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ? तुला दुनिये पासून झाकतात तर मला  उघड्यावर टाकतातकुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?  

पदर आला तेव्हापासन तुझ्या आईबापान तुला दुनिये पासन झाकलीतेव्हांच या भडव्यांनी मला बाजारात टाकली. तुझ्या पाठीवर हात फिरावरत तर माझ्या छातीवर हात टाकतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तू ज्यांना अंकल, काका, पप्पा म्हणते ना त्यांना आम्ही "मरद" म्हनतो. काळे बिद्रे, उघडे केसाळ, रोज माझ्या अंगाला झोंबतात. तुझ्या समोर सभ्य बनून राहतात, तुला मायेन वागवतात आनि मला रात्रभर जागवतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

सकाळ होता होता पोट कंबर दुखाया लागत, डोळ्यात पाणी वहाया लागतं. त्या टाइमला  तू गाड झोपलेली असते. तुझी माय तुझं पांघरून नीट करत असते.  मला आपले आपाच आसू पुसाया लागतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुला जशी माय हायेना तशी मला  हाये, तिचं नाव भाकर हाये. ती पोटात गेली कि उब मिळते, फार दिवस ताटातूट झाली कि रडू फुटते. तिच्याच साठी हे भडवे मला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुझ्या जवळ जशी बाहुली हायेना ना तशी मला पण मिळणार हाये. एक बाबा म्हनतो ती माझ्या पोटातून येणार हाये. तिला  काडून टाक असे सगळे सांगतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुझ जग रंगीन गुलाबी, माझं काळ शराबी. तुझ्या चेहऱ्यावर येनार  हसू काही वेगळच हाय. माझ्या चेहऱ्यावर ते कधी आलच नाय. लई वाटत मी पण तुझ्या जगात यावं, बाहुली बरोबर खेळावं, रात्री शांत निजाव. पण माझ्या कडून तुझ्या जगात येणार रस्ताच नाय. अश्या कश्या आयुष्यभर पुरनाऱ्या  बेड्या पायत टाकतात.


कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ? तुला दुनियेपासून झाकतात तर मला  उघड्यावर टाकतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?